अंतरंग – भगवद्गीता – विभूतियोग

शराब पीने दे मस्जिद में बैठ कर, या वो जगह बता जहाँ ख़ुदा नहीं।
मस्जिद ख़ुदा का घर है, पीने की जगह नहीं, काफिर के दिल में जा, वहाँ ख़ुदा नहीं।
काफिर के दिल से आया हूँ मैं ये देख कर, खुदा मौजूद है वहाँ, पर उसे पता नहीं।

संत नामदेव नित्य नेमाने विठ्ठलाशी संवाद करत असत. एकदा विठ्ठलाने त्यांना सांगितले की ‘जोपर्यंत तुझ्यावर गुरुकृपा होत नाही तोपर्यंत तुला निर्गुण निराकार भगवंताच्या वास्तविक स्वरुपाचे ज्ञान होणार नाही. तेव्हा तू विसोबा खेचर नामक गृहस्थांना भेट. ते तुला उत्तम दृष्टांत देतील.’ नामदेव जेव्हा विसोबा खेचरांना भेटायला गेले तेव्हा त्यांना विलक्षण दृष्य दिसले. विसोबा निवांतपणे पहुडले होते आणि त्यांचे पाय महादेवाच्या पिंडीवर विसावले होते. ते पाहून नामदेवांना सहाजिकच राग आला. ते पाहून विसोबा म्हणाले, “बाबा रे, वार्धक्यामुळे मला पाय उचलणेही कठीण जाते. तूच माझे पाय उचल आणि दुसरीकडे टेकव” नामदेवांनी विसोबांचे पाय उचलले आणि दुसरीकडे ठेवले. परंतु तेथेही तेच झाले. पाय टेकताच त्याच्या खाली पुन्हा महादेवाची पिंड दिसायला लागली. नामदेवांना कळेना. हा जागा बदलण्याचा उद्योग चार पाच वेळा करुनही तोच परिणाम दिसायला लागल्यावर नामदेव विसोबांना शरण गेले. विसोबांनी त्यांना सांगितले की – ईश्वर हा सर्वव्यापी सर्वत्र आहे, मग पाय कोठेही ठेवल्याने काय फरक पडतो. फरक आपल्या दृष्टीचा आहे.

“चराचरातील भगवंताचे हे अधिष्ठान जाणणे म्हणजेच त्याच्या शक्तीचे/विभूतिचे स्वरुप जाणणे होय. ते जाणणारा भक्त भगवंताशी एकरुप होतो आणि भूतातेही भगवंताला प्राप्त करतो.”

विभूति हा शब्द पुरेसा जाणल्यास विभूतियोग जाणणे कठीण नाही. रुढार्थाने विभूति हा शब्द मोठ्या महान व्यक्तीसाठी वापरला जातो. परंतू विभूति शब्दाचा मूळ अर्थ विशेष शक्ती, सामर्थ्य किंवा तेज असा आहे. तेज जे सर्वकाही व्यापते.
अगदी साध्या शब्दात सांगायचे तर ‘वि म्हणजे विशेष’ आणि ‘भूत म्हणजे जीव, भूतमात्र किंवा आपण सारे’! त्यामुळे असा जीव ज्यात काही विशेष आहे त्याला विभूति असे म्हणायला हरकत नाही. असे काय आहे जे विशेष आहेच परंतू सर्व भूतमात्रात आहे? अर्थातच आत्मा, चैतन्य किंवा परमात्म्याचा अंश. म्हणूनच आपल्यातील परमात्म्याला जो जाणतो तोच चराचरातील भगवंतालाही जाणतो आणि म्हणूनच तर अशा ज्ञानी माणसाला वि-भूती म्हणले जाते. श्रीकृष्ण अर्जुनालाही हेच सांगतो की – जे जे उत्तम , उदात्त उन्नत आहे त्याच्या ठायी माझा भाव जाणणे म्हणजेच विभूति जाणणे. ते जे उन्नत उदात्त आहे ते स्वतः आणि ते जाणणारा व्यक्ती दोघेही विभूतिमत्वाला पोचतात.

(अशा उदात्ताच्या ध्यासातून मिळणारी मुक्ती किंवा मोक्ष हे प्रत्येक भूताचे ध्येय आहे. म्हणूनच तर सावरकरांनी मोक्ष आणि मुक्ती ही स्वातंत्र्यदेवतेची रुपे आहेत असे म्हटले आहे. केवळ इंग्रजांचे जोखड मानेवरून उखडून टाकणे म्हणजे स्वातंत्र्य नव्हे तर जे जे उत्तम, उदात्त आणि उन्नत आहे त्याचा ध्यास घेणे हे सावरकरांना अभिप्रेत असणारे स्वातंत्र्य होते. विभूति कोणाला म्हणावे हे येथे स्पष्ट व्हावे!! असो)

मुण्डक उपनिषदापासून ते भागवतपुराणापर्यंत तत्वज्ञानाच्या अनेक ग्रंथात आणि अगदी किरातार्जुनीयासारख्या महाकाव्यातही ‘विभूति’ हा शब्द विशेष शक्ती, तेज किंवा परमात्म्याचा अंश याच अर्थाने वापरला आहे. श्रीकृष्णही अर्जुनाला आपल्या विभूतिंचा परिचय अनेक उदाहरणातून करून देतो.
येथे केवळ हे ध्यानात घ्यायचे आहे की ही उदाहरणे आहेत. याचा केवळ भगवंताने वर्णन केलेल्याच विभूतित त्याचे अस्तीत्व जाणवते आणि इतरात नाही असे नाही. विसोबांनी सांगितल्याप्रमाणे भगवंत सर्वाभूती सर्वव्यापी आहे केवळ साधकाला म्हणजे अर्जुनाला (आणि आपल्यालाही) समजण्यास सोपे जावे म्हणून वानगीदाखल घेतलेली नावे ही या अध्यायात येतात. भगवंताच्या विभूति योगाबद्दल पुढील भागात.
तळटीप
१. क्षेत्रज्ञ एता मनसो विभूति जीवस्य मायारचितस्य नित्याः।
आविर्हिताः क्वापि तिरोहिताश्च शुद्धो विचष्टे ह्यविशुद्धकर्तुः ॥ (भागवत – ५/१२)
२. यं यं लोकं मनसा संविभाति विशुद्धसत्त्वः कामयते यांश्च कामान् ।
तं तं लोकं जयते तांश्च कामांस्तस्मादात्मज्ञं ह्यर्चयेत्भूतिकामः। (मुण्डकोपनिषद – ३.१.१०)
३. हित्वेतरान् प्रार्थयतो विभूतिः। यस्याङ्‌घ्रिरेणुं जुषतेऽनभीप्सोः।(भागवत – ५/१२/२०)
४. त्रीनत्यरोच उपलभ्य ततोविभूतिं लोकान् स मां व्यसृजदुत्स्मयतीं तदन्ते। (भागवत – १/१६/३५)
५. इत्युक्तवन्तं परिरभ्य दोर्भ्यां तनूजं आविष्कृतदिव्यमूर्तिः।<>br अघोपघातं मघवा विभूत्यै भवोद्भवाराधनं आदिदेश । (किरातार्जुनीय ११.८०)

Copyright https://sheetaluwach.com/2021 © #sheetaluwach

अंतरंग-भगवद्गीता – राजविद्याराजगुह्ययोग (अंतिम)

सातव्या अध्यायाच्या अंतिम श्लोकात, भक्तीचे आणि भगवंताच्या साक्षात्काराचे स्वरुप सांगत असताना, श्रीकृष्ण ‘अधिभूत’, ‘अधिदैव’ आणि ‘अधियज्ञ’ अशा संज्ञा वापरतो. त्यांचे अर्थ पुरसे न समजल्याने अर्जुन त्याला अध्यात्मासह सर्व संज्ञांचा अर्थ विचारतो. त्यामुळे आठव्या अध्यायात श्रीकृष्ण त्याला या सर्व संकल्पना विस्ताराने समजावून सांगतो. त्यानंतर अर्थातच तो आपली वि-ज्ञानाची चर्चा पुढे चालू ठेवतो. म्हणूनच ‘राजविद्याराजगुह्ययोग’ हा अध्याय खरंतर ज्ञानविज्ञानयोगाचा पुढील भागच म्हणायला हवा. या अध्यायाच्या सुरुवातीच्या श्लोकात श्रीकृष्ण हे स्पष्ट करतो.

इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे । ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात्‌॥
दोषदृष्टीरहित अशा तुला भक्ताला हे अतिशय गोपनीय विज्ञानासहित ज्ञान पुन्हा नीटपणे सांगतो. ते जाणल्याने तू अ-शुभापासून मुक्त होशील.

ज्ञानविज्ञानात सांगितलेले विशेष ज्ञान असो किंवा त्याही आधी विषद केलेले ज्ञान आणि कर्मयोग, श्रीकृष्ण वारंवार त्याच तत्वांचा पुनरुच्चार करतो, उदाहरणे देतो. त्यामुळे अर्जुनाच्या मनातील शंका दूर होतात आणि आपल्याही!
नवव्या अध्यायात श्रीकृष्ण सांगतो की –
‘प्रत्येक युगाच्या अंती सर्व भूतमात्र मला येऊन मिळतात आणि नवीन युगाच्या आरंभी मी त्यांचे पुनः सर्जन करतो.’
येथे हे ध्यानात घेतले पाहीजे की – या श्लोकातील ‘मी’ हा सृष्टीकर्ता परमात्मा आहे. श्रीकृष्ण हे त्या परमात्म्याने धारण केलेले एक मूर्त रूप (अवतार) आहे.
येथे अवतार या शब्दाचा नीट अर्थ समजून घेणे उचित ठरेल. अव + तृ याचा अर्थ (खाली) उतरणे असा होतो. परमात्मा जेव्हा मूर्त रुपाने खाली (येथे भूलोकात) उतरतो तेव्हा त्यास अवतार असे म्हणतात. एका अर्थाने परमात्म्याच्या अंशरुपाने अवतीर्ण झालेले मूर्त रुप (अवतार) हे आपल्यासारखेच भूतमात्र आहे. कारण आपल्यातही त्याच परमात्म्याचा अंश आहे. म्हणूनच राम काय किंवा कृष्ण काय हे भूतलावर अवतीर्ण झाल्यानंतर सामान्य मनुष्याप्रमाणे जीवन व्यतीत करतात, सुखदुःख भोगतात. आपल्यात आणि त्यांच्यात फरक इतकाच की जे तत्व जाणायला आपल्याला अनेक जन्म लागतात ते तत्व त्यांना याच जन्मी उमगते. त्याप्रमाणे आयुष्य व्यतीत करून ते पुन्हा परमात्म्यात विलिन होतात.
श्रीकृष्णही अर्जुनाला हेच सांगतोय.

सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकाम्‌ । कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम्‌॥
हे कौन्तेया (कुंतीपुत्रा), कल्पाच्या (युगाच्या) शेवटी सर्व भूते माझ्या प्रकृतीत विलीन होतात आणि कल्पाच्या आरंभी त्यांना मी पुन्हा उत्पन्न करतो.

मी जरी त्यांना उत्पन्न करत असलो तरी या कर्माचे फल मला बाधत नाही. कारण हे सर्जन अत्यंत निष्काम वृत्तीनेच मी करतो. कर्मसिद्धांतानुसार फळाच्या अपेक्षेशिवाय, निष्काम वृत्तीने केलेल्या कर्माचे बंधन बाधत नाही. म्हणूनच श्रीकृष्ण पुढे म्हणतो की प्रत्येक भूतमात्र हे कर्माच्या फलस्वरुप माझ्यापासून उत्पन्न होतात. परंतु मी त्यांच्यात नसतो. कारण प्रत्येकाच्या कर्मफलानुसार त्याचे सर्जन होते आणि हे कर्म मी निष्काम भावनेने करतो.

मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना । मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्ववस्थितः॥
अव्यक्त (अशा) मी (परमात्म्याने) हे सर्व जग पूर्ण व्यापलेले आहे. सर्व भूते माझ्यामध्ये संकल्पाच्या आधारावर राहिलेली आहेत. पण मी त्यांच्यामध्ये राहिलेलो नाही.

म्हणूनच जसा मी, कर्माच्या ठायी उदासीन असतो तसे उदासीन राहणारा व्यक्तीही जन्ममृत्युच्या चक्रातून मुक्त होऊन मला येऊन मिळतो.परंतु याउलट हा भाव न जाणणारे मूढ लोक, अवतार घेऊन कर्म करणाऱ्या मला सामान्य मनुष्य समजतात. सकाम भक्ती करणारे लोकही याच प्रकारे कर्मबंधनाने बाधित होतात, असे श्रीकृष्ण म्हणतो.
ज्ञानविज्ञानयोगात श्रीकृष्णाने भक्तांचे चार प्रकार सांगितले आहेत. अर्थार्थी, आर्त, जिज्ञासु आणि ज्ञानी. यातील सकाम भक्ती करणारे अर्थार्थी, आर्त आणि जिज्ञासु भक्त परमेश्वराला तत्वतः जाणत नाहीत. ते काही एक उद्दीष्ट्य समोर ठेवून भक्ती/उपासना करतात. म्हणूनच मग आपल्या कर्मासंबंधी उदासीनता प्राप्त होत नसल्याने जन्ममृत्युच्या चक्रात अडकतात. आपल्या कर्माच्या फलस्वरुप पुण्य प्राप्त करुन स्वर्गात जातात. पुण्यक्षय झाल्यानंतर पुन्हा मृत्युलोकात येतात.

ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति। एवं त्रयीधर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते।
ते त्या विशाल स्वर्गलोकाचा उपभोग घेऊन पुण्याई संपल्यावर मृत्युलोकात येतात. अशा रीतीने तिन्ही वेदात सांगितलेल्या, सकाम कर्मांचे अनुष्ठान करून भोगांची इच्छा करणारे पुरुष वारंवार ये-जा करीत असतात. (अर्थात पुण्याच्या जोरावर स्वर्गात जातात आणि पुण्य संपल्यावर मृत्युलोकात येतात.)

अतिशय साधे परंतु परिणामकारक तत्व येथे श्रीकृष्ण सांगतो. जो ज्याची इच्छा, कामना किंवा भक्ती करतो तो त्या गतीला प्राप्त होतो.

(आपला शाहरुख ते …कायनात वगैरे वाल्या शेरात तरी दुसरे काय सांगतो म्हणा :P)

यान्ति देवव्रता देवान्पितॄन्यान्ति पितृव्रताः । भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोऽपि माम्‌।
देवांची पूजा करणारे देवांना मिळतात. पितरांची पूजा करणारे पितरांना जाऊन मिळतात. भूतांची पूजा करणारे भूतांना प्राप्त होतात आणि माझी पूजा करणारे भक्त मला येऊन मिळतात. त्यामुळे माझ्या भक्तांना पुनर्जन्म नाही.

अशाप्रकारे जे ज्याचे उपास्य दैवत तो त्या गतीला पोचतो. भौतिक सुख हवे तर त्याची उपासना करा, वस्तु किंवा पद हवे तर त्याची. व्यक्ती जसे आणि जितके प्रयत्न करेल त्यानुसार फळ त्याला मिळेल यात शंका नाही.
मग जर परमात्म्याला प्राप्त करायचे तर भक्तीही परमात्म्याचीच करायला हवी!

तानसेनाची एक सुंदर कथा आहे.
सम्राट अकबर आपल्या दरबारात बसून मोठ्या उत्कंठेने तानसेनाचे गाणे ऐकत असतो. केवळ आपल्या सुरांच्या मायेने तानसेन दरबाराला मोहून टाकत असतो. अकबराला असा प्रश्न पडतो की हेच गायन जर अद्भूत वाटते तर तानसेनाला ते शिकविणा-या गुरुंचे गायन कसे असेल? अकबराच्या या प्रश्नावर तानसेन म्हणतो की माझे गायन त्या तुलनेत काहीच नाही. माझ्या गुरुंचे गाणे हे अलौकीक असा साक्षात्कार देणारे गाणे असते. मी त्याच्या अनुभव प्रत्यक्ष घेतलेला आहे. अकबरालाही या अनुभवाची आस लागते. अकबराच्या हट्टापायी दोघेही तानसेनाच्या गुरुंच्या शोधार्थ निघतात. काही काळानंतर हिमालयातील एका गुहेत गुरुदेवांची भेट घडते. एके दिवशी सुर्योदयाच्या वेळी अकल्पितपणे गुरुदेव गायनास सुरुवात करतात. संपुर्ण विश्व स्तब्ध झालंय आणि निसर्गासह आपल्या शरीरातील कणन् कण केवळ गाणं ऐकतोय असा अलौकिक अनुभव अकबराला येतो! संपूर्ण भारावलेल्या अवस्थेतून जेव्हा तो भानावर येतो तेव्हा गायन संपवून गुरुदेव निघुन गेलेले असतात. सहाजिकच अकबर तानसेनाला विचारतो की अशा प्रकारचे गायन तानसेन का करू शकत नाही या प्रश्नावर तानसेन उत्तरतो, “मी भूतलावरील अनेकांपैकी एका राजाला प्रसन्न करण्यासाठी गातो तर माझे गुरुदेव हे एकमेवाद्वितीय अशा अनन्य भगवंताला प्रसन्न करण्यासाठी गातात. तानसेनाचे गायन मानवाला अर्पण होते आहे तर गुरुदेवांचे परमात्म्याला! जो ज्याची उपासना करतो त्याला तशी गती प्राप्त होते.

येथे शेवटचे वाक्य नीट समजून घेतले पाहीजे. अनेकदा असे सांगितले जाते की खुप पुण्य केले की मोक्ष प्राप्ती होते. हे अर्धसत्य आहे. पुण्याची प्राप्त केल्याने उत्तम गती प्राप्त होते कारण ते एक चांगले कर्म आहे. चांगले कर्म चांगली गती असे साधे सूत्र आहे. म्हणून मग पुण्यात्मा स्वर्गस्थ होईल आणि पुण्यक्षय झाला की पुन्हा भूलोकी जन्म घेईल. पाप पुण्य, सुखदुःख किंवा चांगले वाईट हे परस्परविरोधी अवस्था दाखविणारे हे भोग आहेत. पाप केलं दुःख प्राप्त होते, पुण्य केले सुख प्राप्त होते. मोक्ष याच्या पलिकडे आहे. मोक्ष म्हणजे पाप आणि पुण्य या दोन्हीच्याही पुढची अवस्था आहे. म्हणून त्याच्या विरुद्धार्थी अवस्थाच नसते! परमात्म्याची प्राप्ती ही अनन्यसाधारण अवस्था आहे म्हणूनच त्याची भक्ती ही अनन्यभावनेनेच केली पाहीजे.
हे झाले सकाम भक्तीबद्दल…
श्रीकृष्णाला आवडणारा ज्ञानी भक्त मात्र भगवंताचे अनन्य स्वरुप जाणतो आणि त्याची निष्काम उपासना करतो. त्यामुळे कर्माची बंधने टाळून परमगती प्राप्त करतो.

महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः । भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्‌।
परंतु हे पार्था, दैवी प्रकृतीचा आश्रय घेतलेले महात्मे मला सर्व भूतांचे सनातन कारण आणि अविनाशी अक्षरस्वरूप जाणून अनन्य चित्ताने युक्त होऊन निरंतर भजतात.

म्हणूनच श्रीकृष्ण म्हणतो की जे अशा प्रकारे अनन्यभावाने माझी भक्ती करतात त्यांना त्यांची योग्य गती मी प्राप्त करून देतो.

अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते । तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्‌।
जे अनन्य प्रेमी भक्त मज परमेश्वराला निरंतर चिंतन करीत निष्काम भावाने भजतात, त्या नित्य माझे चिंतन करणाऱ्या माणसांचा योगक्षेम मी स्वतः त्यांना प्राप्त करून देतो.

योगक्षेमम् वहाम्यहम्। या उक्तीचा असा अर्थ घ्यायचा आहे.
अशाप्रकारे ज्ञानविज्ञानयोगात प्रारंभ केलेले परमात्म्याच्या साक्षात्काराचे विवेचन येथे नवव्या अध्यायात श्रीकृष्ण पूर्ण करतो.

मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना । मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्ववस्थितः।

परस्परविरोधी वाटणारे परंतु कर्मसिद्धांताचे समर्थन करणारे हे तत्व जाणणे ही खरी श्रेष्ठ विद्या आहे म्हणून याला राजविद्या असे म्हटले आहे. पाप पुण्याच्या कोष्टकातील सकाम भक्तीच्याही पुढे जाऊन निष्काम भावनेने परमात्म्याची भक्ती केल्यासच त्याची प्राप्ती होते हे खरे गुह्य (गुपित किंवा गुढ तत्व) म्हणूनच या अध्यायाचे नाव राजविद्याराजगुह्ययोग असे ठेवले आहे.

**गंमतीचा भाग असा की राजगुह्य या शब्दाचे दोन्ही भाग हे एकमेकांचे हिंदी आणि मराठी प्रतिशब्दच आहेत.

असो भगवंताच्या साक्षात्काराबद्दल पुढील भागात.

मागील भाग – अंतरंग – भगवद्गीता – राजविद्याराजगुह्ययोग

Copyright https://sheetaluwach.com/2021 © #sheetaluwach

ओळख वेदांची – सामवेद

मागील दोन भागात आपण ऋग्वेद आणि यजुर्वेदाची माहिती करून घेतली. वेद परिवारातले तिसरे भावंड म्हणजे ‘सामवेद’. मुर्ती लहान पण किर्ती महान असे हे बालक आहे. प्रत्यक्ष भगवंताने गीतेतील विभूतियोगात “वेदानां सामवेदोऽस्मि” असं म्हणून सामवेदाचं महत्व अधोरेखित केलं आहे. शतपथ ब्राह्मण, बृहद्देवता असे अनेक ग्रंथ सामवेदाचा गौरव करतात. मुख्यतः भारतीय संगीताचा उगम म्हणून सामवेदाकडे पाहिले जाते.

साम हा शब्द सा (ऋचा) + अम् (आलाप) असा तयार होतो. वेदातील ज्या ऋचांवर आलाप किंवा गायन करायचे त्यांचा संग्रह म्हणजे सामवेद असे म्हणता येईल. ऋचा आणि साम हे एकमेकांशिवाय असूच शकत नाहीत. त्यामुळे हे दोघे जणु पति पत्नीच आहेत असे म्हटले आहे! याचाच अर्थ गायन हे आपल्या उपासनापद्धतीचा एक अविभाज्य अंगच होते.

सामवेदाची रचना कशी आहे?

पूर्वार्चिक व उत्तरार्चिक असे सामवेदाचे दोन भाग आहेत. सामवेदातील मंत्रांची संख्या साधारण १८७५ असून त्यातील ९९ मंत्र सोडले तर बाकी सर्व मंत्र ऋग्वेदातील आहेत. पुर्वार्चिकात देवतांच्या स्तुतीपर मंत्र आहेत तर उत्तरार्चिकात यज्ञात आवश्यक असणा-या ऋचांचा संग्रह आहे.

ज्या मंत्रांच्या आधारावर गायन केले जाते त्याला योनिमंत्र म्हणतात. यालाच आपण आजच्या भाषेत थाट म्हणू शकतो. अशा एका योनिमंत्रावर अनेक गाणी गायली जाऊ शकतात. ऋग्वेदातील एकाच मंत्राचे गायन गौतम किंवा कश्यप असे ऋषीं त्यांच्या त्यांच्या शैलीने करत असत. जसे आज दोन भिन्न घराण्यातील गायक एकच राग त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने मांडतात.

उदाहरणार्थ ऋग्वेदातील एक मंत्र आपण सामयोनिच्या नोटेशनसकट पाहुयात

मूळ मंत्र –

अग्न॒ आया॑हि वी॒तये॑ गृणा॒नो ह॒व्यदा॑तये ।नि होता॑ सत्सि ब॒र्हिषि॑ ॥ (ऋ ६.०१६.१०)

आता हाच मंत्र गाण्यासाठी योनिमंत्र म्हणून सामवेदात कसा दिसतो ते पाहु

Yoni Mantra - Basic Notation of a Hymn in Samveda.
सामवेद योनिमंत्र

अक्षरांच्या वरील अंक हे उदात्त, अनुदात्त, स्वरित इ. स्वर दर्शवतात. हा झाला योनिमंत्र किंवा थाट. आता या चलनाचा आधार घेऊन जेव्हा मंत्र म्हटले जात तेव्हा त्याचा मूळ गाभा तसाच ठेऊनही वेगवेगळ्या प्रकारे गायन मांडले जायचे. यात शब्दांची किंचित ओढाताण होत असे.

उदाहरणार्थ हाच मंत्र गौतम कुलाच्या गायनात असा दिसेल

Parka by Gautama - A specific style of Samveda singing by Gautama
गौतमस्य पर्कम् ।

अशाप्रकारे सामगायनाचे किमान एक हजार प्रकार अस्तीत्वात होते, असे उल्लेख आहेत. यावरून त्याकाळची गायनकला किती समृद्ध होती याचा अंदाज येतो. भारतीय संगीतातील श्रुतींसारख्या सूक्ष्म आणि घराण्यांसारख्या व्यापक विविधतेचे मूळ अशाप्रकारे सामवेदात आढळते.

हा गायनाचा प्रकार त्याकाळी नक्की कसा असावा याचा अंदाज आज करणे अवघड आहे. कारण सामगायन करणा-या परंपरा जवळपास लुप्त झाल्या आहेत. परंतु मौखिक परंपरेने जे जतन केले गेले आहे त्यातील एक छोटी क्लिप ऐकून आपण अंदाज घेऊ शकतो.

सामवेद गायन Source – Alaap-A Discovery Of Indian Classical Music

आश्चर्याची गोष्ट म्हणजे हिंदु धर्म अभिमानाने मिरविणा-या बाली बेटावर एका केचक नृत्यामध्ये असाच रंगलेला आलाप अलिकडेच ऐकायला मिळाला.

सामवेदात आपल्याला परिचयाचे काय आहे?

साम, दाम, दंड, भेद या म्हणीतील साम या शब्दाचा अर्थ गोड बोलणे असा होतो. सामगायनातील गोडवा या अर्थानेच हा शब्द रुढ झाला.

कुंदनलाल सैगल (चित्रपट – तानसेन) आणि मन्ना डे (चित्रपट – संगीत सम्राट तानसेन) यानी अजरामर केलेले सप्त सुरन तीन ग्राम हे गाणं आठवतंय का? या गाण्यातील स्वरमंडलाचे वर्णन हे सामवेदातील स्वरमंडलाचे नारदीय शिक्षेत आलेले वर्णन आहे.

सप्तस्वराः त्रयो ग्रामाः मूर्छनास्त्वेकविंशति। ताना एकोनपंचाशत् इत्येतत्स्वरमण्डलम्।

देवळात गायलेल्या आरतीपासून ते मैफिलीत गायलेल्या रागापर्यंत भारतीय संगीताचे मूळ सामगायनातच आहे. गायन हा देवाच्या उपासनेचा सर्वोत्तम मार्ग आहे त्यामुळे संगीताला नादब्रह्म मानले जाते. वेदातील आकाराने लहान भावंड असूनही भारतीय संगीत आणि उपासना पद्धतीचा पाया सामवेदाने उभा केला. म्हणूनच तर श्रीकृष्णासह जवळपास प्रत्येक थोर ऋषीमुनींनी सामवेदाला भारतीय ज्ञानवाङ्मयात उच्च स्थान दिलेले आहे.

तळटिप

१.गीता अध्या. १० श्लोक २२
२. सर्वेषामं वा एष वेदानाम् रसो यत् साम (शतपथ ब्राह्मण १२.८.३.२३)
३. सामानि यो वेत्ति त वेद तत्त्वम् । (बृहद्देवता)
४. अमोSहमस्मि सा त्वं, सामाहमस्मि ऋक् त्वं। द्यौरहं पृथिवी त्वं। ताविह संभवाव, प्रजामाजनयावहै (अथर्ववेद १४/२/७१)
५. सामवेद – म.म पं. श्रीपाद दामोदर सातवळेकर (पृ,क्र ६)
६. एकशतमध्वर्युशाखाः, सहस्रवर्त्मा सामवेदः ॥ महाभाष्य

मागील भाग – ओळख वेदांची – यजुर्वेद पुढील भाग – ओळख वेदांची – अथर्ववेद

Copyright sheetaluwach.com 2020 ©

Quest – Bhagavad Gita – Part 3

Perspective …. Arjuna Vishada Yoga!

Perspective ……….. Perspective of an individual exercises profound effect on his expression. This is evident in the case of artists. The foundation of a creation rests on how an artist looks at the subject. If an artist’s approach to a subject, thought or an event is different, then the artistic expression that emerges from it can also be dramatically different.

Christopher Marlow generates a horrific picture of man’s lust of power and fame in ‘Doctor Faustus’, a tragic play based on a concept of a mortal possessing heavenly powers. The same concept is depicted in a hilarious comedy ‘Bruce Almighty’…  what differs is approach… Perspective of the artist towards a concept.

Arjuna Vishada… The same is true about the first chapter in Gita. Since this chapter has been consistently presented in the form of Arjuna’s lament, most of the readers find it melodramatic and Arjuna, an emotional fool! The solicitous side of Arjuna doesn’t surface unless we change our perspective… Conscience.

Conscience … the intellect to know the difference between right and wrong.

Conscience …. the patience that makes you think about the consequences before taking any step.

Conscience …. the difference between Arjuna and other warriors who had inhuman and destructive powers and were eager for war…

Numerous great warriors during the Mahabharata war were equipped with infinite power and divine weapons. Majority of them were eager to practice those weapons. But how many of them were mindful of the immeasurable damage these divine weapons could bring? Most of them were marching impatiently burning with selfishness or vengeance.

Perspective…….. ‘Eye for an eye makes the whole world blind’. Sheer Aggression or Vengeance as an approach to victory causes extermination!!

How much more should the conscience of a hero who has the power to destroy millions of families be awakened? Arjuna manifests this conscience. The restraint appears through Arjuna Vishada.

He does not dare take up arms unless he’s convinced of the inevitability of war and destruction. Not because he is weak or faint-hearted, but because he is confident of his destructive power. He is aware of the all-encompassing effects of genocide…

Arjuna stands out in this chapter not only as a mighty warrior but also as a mature, prolific and prudent leader. He is sure that if he has to be the future ruler, he has to take every step thoughtfully. Since the society will set him as a role-model and will follow his footsteps. That is why he inspects the horrible consequences of war from different perspectives and roles. Effects on all factors such as an individual, family, society, religion, economics, politics, values…

Knowing all this, he wants a satisfactory answer as to why is he waging war? Because as a prudent person and a future ruler, he has to take the moral responsibility of this war and justify it to the next generations. That is why he is anxious to take up arms without getting fully convinced.

Attitude … Inquisitiveness ….

Apart from presenting the ferocity of war and Arjuna’s maturity, there can still be a feature in Chapter 1. Which appears in the subsequent chapters as well. Curiosity …. desire for knowledge ….

There is a story in the Mahabharata. It is said that Drona used to play a trick while teaching archery to the Kauravs and Pandavas. In the morning, he would send each student with a container to fetch water. Since the vessel given to Ashwatthama had wider mouth, he used to come back earlier than others. Then Dronacharya used to teach him some distinct tricks till other disciples arrived. Only Arjuna comprehends this clue and manages to reach with Ashvatthama to become the beneficiary of this special class. Later he was also chosen to perform penance and travel to obtain divine weapons. Moreover, the fact that Arjuna was closest to Lord Krishna amongst the Pandava siblings clearly indicates that Arjuna was not only a mighty warrior but also a curious scholar.

That’s why mere Yudhisthira’s word or Krishna’s order isn’t enough for him. He knowingly turns down such appeals. His conscience keeps alarming that an annihilation demands much more substantial and comprehensive purpose than just vengeance.

Hence before taking any step he seeks multifarious enlightenment from Krishna. He wants to understand inevitability of war from different perspectives.

Arjuna, a curious seeker and a true worshiper of knowledge was the reason why a divine being like Krishna detailed the knowledge in 17 Chapters. Greater the seeker’s curiosity, greater the scope of knowledge! Therefore, attainment like Gita resulted out of the curiosity of a seeker like Arjuna.

And of course, if it was not for Arjuna Vishada, would Krishna have recited Gita? And would we have received it so easily?!

Therefore, the knowledge in the 17 chapters of Gita is a gift of Arjuna Vishada.

What is this gift … Sankhya Yoga …. in the next part …

Previous – Quest-Bhagavad Gita – Part 2 Next – Quest – Bhagavad Gita – Part 4

Copyright sheetaluwach.com 2020 © #sheetaluwach

Quest – Bhagavad Gita – Part 1

Welcome Friends!
Our First Series of articles will be about Bhagavad Gita.
On this forum we are going to discuss knowledge, philosophy and culture. Sounds a bit too comprehensive isn’t it? But it helps. When your subject matter covers almost everything; you tend to avoid futile discussions like why something is or isn’t a topic being discussed here, you’d rather focus on the discussion!!
Alright then let’s begin. World over, amongst the forums of philosophical discussions Gita has always been a hot cake of all the scriptures. Since childhood we have been hearing about this book in various contexts. As a child, some (Indians especially) may have memorized at least one of these chapters (often by force!). We move ahead with our life but the curiosity persists. Very few rarely try and pursue the book. Surprisingly Gita keeps knocking our door along the way, through trainings, TV serials, management presentations, online content, etc. The book keeps coming back to us rekindling our curiosity.
We know about Gita as a book of wisdom that solves most common but unusual questions the mankind faces. Gita crosses our path every now and then but does not grip our attention. Perhaps because philosophy and the Sanskrit language are the two seemingly dry and often avoided mediums!
First of all, let us learn some basic facts about Gita.
Gita is built in the form of verses. The total number of verses (shloka) is 700 enunciated by 4 talking personas.
Dhritarashtra – Father of the Kauravas and Emperor of Hastinapura. He is blind by birth. The only verse (shloka) he owns in the Gita is the first verse of the book. He ignites the engine. Like a child seeking a story from his Grandpa…..! He simply asks a question ‘O Sanjaya, what is going on at Kurukshetra, the battlefield of Kurus’ and the Gita begins. The character of Dhritarashtra ends here.
Sanjaya – The charioteer of Dhritarashtra and the temporary war correspondent during that time. He delivers live commentary on Kurukshetra war for Dhritarashtra. He has 41 verses (shloka) in the Gita.
Arjuna – The archer brother amongst the Pandavas. He has 84 verses to his name in the Gita. Majority of these appear in the first chapter.
Lord Krishna (Krsna) – Almighty! Who preaches Gita to Arjuna on the battlefield. The highest number of verses in the Gita i.e. 574 verses are, of course delivered by Lord Krishna. He’s the orator rather author of the Philosophy.
The Gita is divided into a total of 18 chapters. The name of each of these is suffixed as ‘Yoga’. i.e. Arjuna Vishada Yoga, Sankhya Yoga, Karma Yoga etc. Every Yoga is prefixed by the main topic of that chapter. For example, the name of the 14th chapter is ‘Gunatraya Vibhaga Yoga’. It, as the name suggests has the characteristics of ‘the three qualities’ and their symptoms.
Volumes of content is published every day across multiple media platforms, pushing back the old ones into oblivion. Assuming a bunch of 10 verses (shloka) printed on each page, making a total of 70 pages; I mean, Gita is as short as a kids story book! Then what is it about the Gita that keeps going for thousands of years? What is in it that keeps appealing to generations of mankind? The answer is pretty simple.
In fact, the answer lies in the question itself. What has been the rarest and most valued gift to mankind amongst all species? An inquisitive and curious mind! Since the beginning of civilization or rather the beginning of the beginning itself, human being has always been on a quest. A quest about Life. A quest about existence, emotions, purpose and everything about these that is unfathomable or unknown. The questions Arjuna had before the war began is what shadows the human mind even today, despite achieving so much of material progress. Gita provides answers……solutions….to the eternal queries of mankind.
What are these queries……. What did Arjuna seek?
Questions …………. Arjunavishada ……………. in the next part.

Next Part – Quest- Bhagavad Gita – Part 2

Copyright sheetaluwach.com 2020 © #sheetaluwach

Difficulty of Being Good

पुस्तक परीक्षण – Difficulty of Being Good – लेखक – गुरुचरण दास…

Difficulty of Being Good हे एका विचारवंताचे चिंतन आहे. लौकीक आयुष्यात अत्यंत यशस्वी ठरलेल्या व्यक्तीलासुदधा न सुटलेल्या कोड्यांची उकल करण्याचा हा एक प्रयत्न आहे. एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर असणारे दास हे महाभारताकडे अतिशय विचारपूर्वक व मोठ्या आशेने वळताना दिसतात. मोठ्या पदावर असणारी किंवा समाजात प्रतिष्ठित असणारी माणसेसुद्धा अचानक एखाद्या गुन्ह्यात किंवा आर्थिक घोटाळ्यात सामील होतात तेव्हा त्यामागचा त्यांचा उद्देश काय असू शकतो? सत्यम सारखी एक आंतरराष्ट्रीय ख्यातीची कंपनी उभी करून देशापुढे आदर्शवत अशी प्रतिमा उभी करणा-या राजूंसारख्या माणसाचा; आर्थिक घोटाळा करण्यामागे काय उद्देश असू शकतो? यश काय पैसा काय, प्रसिद्धी किंवा सत्ता काय; साध्य करण्यासारखी प्रत्येक गोष्ट तर त्यांच्यासमोर हात जोडून उभी होती. जागतिक किर्तीची एक कंपनी तर त्यांनी स्वतःच उभी केली होती. अशा असामान्य श्रेयाचा अधिकारी गुन्ह्याकडे का वळावा?
अपरिमित संपत्ती आणि अत्यंत नावजलेल्या कंपनीची मालकी असणा-या अंबानी बंधूंमध्ये असणा-या वादाचेही कारण हे केवळ दुस-या भावाकडे जास्त असणारी संपत्ती इतकेच असू शकते? २००७ च्या फोर्बस् अतिश्रीमंतांच्या यादीत अनिल हे पाचव्या तर मुकेश हे त्यापेक्षा किंचीत वरच्या स्थानावर होते. भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या ३%, सरकारच्या एकूण आयकर उत्पन्नाच्या १०% तसेच भारताच्या एकूण निर्यातीच्या १४% वाटा केवळ अंबानी बंधूंच्या कंपन्यातून येतो. २००९ साली मुकेशने जगातील सर्वाधिक श्रीमंताच्या यादीत ३-या स्थानावर झेप घेतली तर अनिल ७ व्या स्थानावर घसरले. चक्र फिरुन त्याच प्रश्नावर येउन थांबते यश, पैसा, प्रसिद्धी किंवा सत्ता यापैकी कोणतीही गोष्ट असाध्य नसणा-या दोनही भावंडाचे एकमेकांविरुदध शेकडो खटले कोर्टात चालु असावेत ? कशासाठी? सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेऊन चाळीत दिवस कंठलेल्या एका व्यक्तीने अपार कष्ट आणि जिद्दिच्या जोरावर देशातील्याच नव्हे तर जगातील एक अत्यंत यशस्वी अशा कंपन्यांचे जाळे उभे केले. लाखो करोडो भागधारकांचे हितसंबंध गुंतलेल्या अशा कंपन्यांच्या उत्तराधिका-यांनी मात्र एकमेकांविरुद्ध खटले चालवून याच भारधारकांचे भविष्यही पणाला लावावे हेही एक प्रकारचे कुरुक्षेत्रच नव्हे काय ? भावंडांमध्ये निर्माण होणार दुस्वास केवळ अधिक संपत्ती किंवा सत्ता या कारणांमुळे असू शकतो? प्रथितयश व्यक्तिच काय पण सर्वसामान्य माणूसही आज ज्या संभ्रमित अवस्थेत जगतो त्याचेही कारण काय असू शकते? रोजच्या जीवनात सर्वसामान्य माणूसही कधी स्वतःच स्वतःला फसवतो तर कधी इतरांशी खोटे बोलतो, व्यवसायात बरोबरीच्या व्यक्तिंची कधी पाठराखण करतो तर कधी पाय ओढतो. हे एक प्रकारचे नैतिक आंधळेपण आहे, अस्तीत्वाची लढाई आहे, की टाळता न येणारा परिस्थितीचा फेरा? या संभ्रमावर आपण विजय मिळवू शकतो का ? अर्थात आपल्या या दुरवस्थेला काही प्रमाणात समाज किंवा सरकारही जबाबदार असते. मग आपल्या सर्वच संस्थांची नैतिकदृष्ट्या फेररचना करता येईल का जेणेकरून समाजाप्रति अधिक संवेदनाशील राज्यकर्ता मिळवता येईल?
या किंवा यासारख्या अनेक प्रश्नांच्या समाधानकारक निरकरणासाठी लेखक महाभारताकडे वळतो. सहा वर्षांपेक्षा अधिक काळ महाभारत आणि अनुषंगित अनेक ग्रंथांचा अभ्यास करून लेखक या समस्यांवर उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतो.
या किंवा यासारख्या अनेक प्रश्नांच्या समाधानकारक निरकरणासाठी लेखक महाभारताकडे वळतो. सहा वर्षांपेक्षा अधिक काळ महाभारत आणि अनुषंगित अनेक ग्रंथांचा अभ्यास करून लेखक या समस्यांवर उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतो.
महाभारताच्या सखोल अध्ययनानंतर प्रस्तुत समस्यांच्या मुळाशी कारणे काय असू शकतात हेही लेखकाला उमगते आणि पात्रांच्या सद्सद्विवेक बुद्धीचा आंतरीक संघर्ष म्हणजेच Difficulty of Being Good आपल्या समोर येते.
धर्म या महाभारतातील अढळ आणि अविचल अशा संकल्पनेत लेखक आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधतो. महाभारतातील प्रत्येक पात्राचा ‘स्वधर्म’ आणि त्याचा समाजाला अभिप्रेत असणारा ‘समानधर्म’ या दोन्हीचे सखोल विवेचन लेखक करतो. या दोन्हीची सांगड घालत आयुष्य कसे घालवावे हेच या पुस्तकाचे मर्म आहे. युधिष्ठिरासह महाभारतातील सर्व प्रमुख पात्रांचा या अनुषंगाने एक उत्कृष्ट अभ्यास लेखक वाचकांसमोर मांडतो. दुर्योधनाचा टोकाचा मत्सर आणि युधिष्ठिराची कमालीची संयत वृत्ती, भीष्माचा निःस्वार्थ आणि अश्वत्थाम्याचा अघोरी सूड या सर्व घटकांचे सांगोपांग विश्लेषण लेखक करतो. राज्यकर्ता असूनही पुत्रप्रेमासाठी नैतिक अधिष्ठानापासून ढळणारा कुरुसम्राट आणि त्याच भावनेपोटी आर्थिक घोटाळा करणारा सत्यम् सम्राट किंवा मत्सरापोटी कुरुक्षेत्रावरील अपरिमित नरसंहाराला कारणीभूत असणारा राजपूत्र आणि त्याच मत्सरापोटी लाखो भागधारकांचे भविष्य पणाला लावणारे अंबानी बंधू या सर्वच घटनांना एका संघर्षाची पार्श्वभूमी आहे. विवेक आणि अविवेक, धर्म आणि अधर्म यांचा हा सार्वकालिक संघर्ष लेखक निरनिराळ्या विचारवंतांच्या विचारातून, विविध घटनांच्या माध्यमातून आणि महाभारतातील पात्रांच्या मनोभूमिकेतू आपल्यासमोर मांडतो. अंतिमतः सत्याचाच विजय होतो. म्हणूनच विवेकाची कास धरून केलेली चांगली कृतीच परिपूर्ण समाजाचे अधिष्ठान असते. हा विचार Difficult of Being Good मधून प्रकर्षाने पुढे येतो.

* * *

Copyright sheetaluwach.com 2020 © #sheetaluwach

Translate »
error: Write to us for sharing the writeup https://sheetaluwach.com/contact